HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home People

‘शहाण्या माणसांचा क्लास’

by whatsapp जनता
in People, philosophy, मराठी
428 5
पुण्यातील ठिकाणे
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

‘शहाण्या माणसांचा क्लास’

“अरे, पण गरज काय आहे याची?” हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.

RelatedPosts

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

आज की औरतें

ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना ‘मजेत जगावं कसं?’ हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही, ते मजेतच जगत असतात. किंबहुना, जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत झालेली असते.

आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते. ती काळजी वूडलॅंड, क्राॅक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅरागाॅन ते आनंदानं निवडतात, आनंदानं वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात.

स्वत:ची वाहनं ते स्वत: धुतात, पुसतात. सायकलला स्वत:च आॅईलिंग करतात. घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात. सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वत: तयार करतील. बुटांना पाॅलिश स्वत:च करतील. ते रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की, मोज्यानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोज्यांचा जोड धुवायला टाकतील. हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं.

ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट्स आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो. रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, एसीची गरज पडत नाही. गरज नसताना ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या शंभर जाहिराती पाहिल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. पण गरज असेल तेव्हा रेमण्ड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असंच कापड घेतील. रेडिमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी चार-पाच वर्षं तरी सहज वापरतील.

घरी कुणी आलं की, पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी किंवा शेंगादाण्याचा-रव्याचा-बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा.. (हे सगळे पदार्थ घरीच स्वहस्ते केलेले असतात आणि चहापत्ती होलसेल मार्केटमधून आणलेली असली तर आलं, गवतीचहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची, हे तंत्र बरोब्बर समजलेलं असतं.) आल्यागेल्याचा, पै-पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करतात, रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इंप्रेशन मारायला जात नाहीत.

सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, शेवयाची खीर, चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड (अनेकदा चक्कासुद्धा घरीच करतात) हे पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आलीच तर केळ्याचं शिकरण दोन मिनिटांत तयार..! घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरूष जरी असेल तरी स्वत:च्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो. किंवा वेळप्रसंगी दहीपोहे करूनही उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हाॅटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. ह्या जगण्याला लो प्रोफाईल, मिडलक्लास किंवा चिक्कूपणा म्हणणारी माणसं बिनडोक असतात. कारण, हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे.

यांच्या घरातले पुरूष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लाॅन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात.रद्दीवाल्याकडे स्वत:च रद्दी घेऊन जातात. स्वत: पानं घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वत:चं ताट स्वत: घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर होईपर्यंत छान वापरतात. पाच-सात वर्षं चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. याच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.

मुलाचा पहिला वाढदिवस, पाचवा वाढदिवस खाजगी हाॅल किंवा पार्टी हाॅल घेऊन साजरा-बिजरा करत नाहीत. असल्या कृत्रिम आनंदाची त्यांना गरज नसते. पण मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रॅन्डेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळं, चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या ९८ आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिव्हेशनल ट्रेनरची गरज भासत नाही, ते स्वत:च खंबीर असतात.

कुठलाही प्रश्न टोकाला न नेणं आणि तुटेपर्यंत न ताणणं हे यांचं वैशिष्ट्य. आकांडतांडव करत, कांगावा करत जगणारा हा वर्गच नाही. कारण, त्यांचं आयुष्य म्हणजे ‘आजचा दिवस जगता जगता उद्याची तजवीज’ असं असतं. उद्याची तजवीज म्हणजे फक्त पुढच्या पिढीचीच. पुढच्या सत्तर पिढ्यांची नव्हे. चार वर्षांनी आपल्या मुलाची दहावी आहे आणि त्याला पंधरा-वीस हजार रूपये फी असलेला क्लास लावावा लागेल, हे त्यांना आधीच ठाऊक असतं. मग चार वर्षं आधीच वीस हजार रूपये मुदत ठेव म्हणून वेगळे ठेवले जातात. ते त्यावरचं व्याज खाता यावं म्हणून नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीत मुलाचं उत्तम शिक्षण थांबू नये म्हणून. मग चार वर्षांनी साहजिकच फी चा आकडा वाढून पंचवीस हजार झाला तरी यांना त्याचं टेन्शन येत नाही. बिनदिक्कत भरून टाकतात.

मुलगा हाॅस्टेलवर शिकत असेल तर आई कोरडा खाऊ दर महिन्याला पाठवते. का? तर बाहेरचं चमचमीत खाण्यावर खर्च आणि त्यातून उधळपट्टी करण्याची सवय लागू नये म्हणून. खिशात दहा रूपये असतील तर या कुटुंबातला मुलगा वडापाव खाण्याऐवजी दोन केळी विकत घेऊन खाईल, अगदी आजही. हाॅस्टेलवरसुद्धा मधल्या वेळच्या खाण्याला एखादा पेरू विकत घेऊन खाणारी मुलं मी पाहिली आहेत.
यांच्या घरची मंगल कार्यंसुद्धा अशीच साधी पण छान होतात. दोनशे ते तीनशे माणसांमध्ये कार्य. हजारो माणसं, जेवणावळी, भव्य दिव्य सेट्स वगैरे तामझाम ही माणसं करत नाहीत. त्याची त्यांना गरजच वाटत नाही. त्यामुळं, एक सरळसोट बांधीव आयुष्य जगताना त्यांना उधार, उसनवाऱ्या वगैरे कराव्या लागत नाहीत.

हे जिम लावत नाहीत. पहाटे उठून पर्वती, तळजाईवर जातात, सारसबागेत जातात. कामाव्यतिरिक्त वाहन वापरत नाहीत. सरळ चालत जातात. त्यांना जिमनॅशिअम परवडत नाही का? तसं नसतं. जिथं गरज नाही तिथं ते दमडीसुद्धा खर्च करत नाहीत.
ह्या जीवनशैलीला मध्यमवर्गीय म्हणणंच चुकीचं आहे. न उतणारी, न मातणारी, जगा आणि जगू द्या हा विचार प्रत्यक्ष जगणारी माणसं मिडलक्लास असतात का? मुळीच नाही. चांगलं जगणं आणि योग्य जगणं जगणं हा एक संस्कार आहे, आणि तो संस्कार अंगिकारलेला हा वर्ग आहे. ज्यांना आपल्या परिस्थितीचा कधीही पश्चात्ताप होत नाही, कमीपणा वाटत नाही, अधिकाचा हव्यास जमत नाही, असा हा वर्ग आहे.

आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून, साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवनविमा एवढ्यावर त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काहीही कमावण्याचा विचारही करत नाहीत. “जोडोनियां धन उत्तम व्यवहारें, उदास विचारें वेच करीं” या तुकोबारायांनी सांगितलेल्या पक्क्या धारणेनं जगतात. म्हणून त्यांची वखवख होत नाही, त्यांना भस्म्या होत नाही. षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही.. हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे ना..!

घरात महागडं इंटिरिअर नसलं तरी, घरी कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी मात्र बरोबर पैसे दिले जातात, अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्यांना तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला शंभराची नोट मिळते. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर.. कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही, कसला गुंता नाही, वैचारिक गोंधळ नाही. बेष्ट आयुष्य..! समंजस आयुष्य..! विनाशर्त विनातक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य..!

‘क्रेझ’ या गोष्टीशी यांचा लांबून-लांबून संबंध नसतो. म्हणून यांचे व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात, हट्ट-दुराग्रह तर अजिबातच नाहीत. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एखाद्-दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी वगैरे होते, जमल्यास गुरूपुष्यामृताच्या दिवशी एक ग्रॅम सोनं घरी येतं आणि देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. ह्या जगण्याला ते ‘हा माझा मार्ग एकला’ असं म्हणू शकतात, पण ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ हे म्हणणं त्यांना साधलेलं असतं. ह्या जगण्याला काय म्हणाल? मिडलक्लास? नाही. हा तर खरा वरचा क्लास.. विषमभुज त्रिकोणालासुद्धा समभुज करण्याची अफाट विलक्षण शक्ती ज्यांच्या दृष्टीकोनात ठासून भरली आहे असा क्लास…!

मला फार आनंद आणि अभिमान आहे (माज नाही) की, मी याच क्लासमधला आहे.. मग कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय.. पण हाच आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास…!

©️मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

Tags: Lifestyle

Related Posts

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

by whatsapp जनता
May 8, 2025
0

१९९० पूर्वी…लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!ज्याची भेट...

Read more
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

by whatsapp जनता
May 8, 2025
0

कुंभाराला म्हणाले "मडकं दे". तो पटकन xxx कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर xxx लाही माहित नव्हतं...

Read more
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

by whatsapp जनता
March 18, 2025
0

आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...

Read more
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
Devotional

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

by whatsapp जनता
March 1, 2024
0

औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे हा सोहळा कसा साजरा होतो बघा. आज औदुंबर...

Read more
भगवंताचं ATM
Life

आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी

by whatsapp जनता
February 29, 2024
0

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.