एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.
डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं इकडे तिकडे फिरत होतं. इतरांना ढुश्या देत होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे लोक सैरावैरा धावत सुटतील आणि बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.
तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.
तो त्या माणसाला म्हणाला, “तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो”.
त्या माणसानं लागेच “हो” म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं.
डुक्कराच्या नाकातोंडात पाणी गेलं. मृत्यूभयाने जीवाच्या आकांताने ते पोहायला लागलं. पुन्हा बोटीत येण्यासाठी धडपड करू लागलं
थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. नंतर मात्र ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात पडून राहिलं.
डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, “आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?”.
तत्त्वचिंतक म्हणाला, “दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यातील कष्टप्रद जीवनाची आणि त्यातील धोक्यांची व दुःखाची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं”.
आज भारतात जी डुकरं असहिष्णुता, असुरक्षितता, इथे भय वाटते.. इत्यादी बोंबाबोंब करत गोंधळ घालत आहेत, त्यांना सीरिया, इराक, किंवा सुदान, सोमालियामध्ये सहा महिन्यांकरता पाठवायला हवं. मग भारतात परत आल्यावर ती गपगुमान शांत बसतील.
भारताला सतत शिव्या घालणाऱ्या सर्व ‘भारतीय’ डुकरांना समर्पित.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩