😇 दळणातील जात्या मधील खुंट्या जवळचे दाणे ,,❗
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती.
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता. दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले.
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले.
त्याने विचार केला, आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत.
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला.
कबीर महाराज विचारताहेत…
“कमाल अरे काय झाले रे ?”
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो, आणि म्हणतो…
“जात्यामध्ये सर्व दाणे मेले”
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले.
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली.
खुंट्याजवळ २ , ४ दाणे तसेच चिकटलेले होते…..
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले…
“आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे.”
“तो म्हणजे सदगुरु.”
“त्यांना धरुन ठेवावे.”
“त्यांचा आधार घ्यावा.”
“जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते…”
विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु….
त्यांचा आधार घ्यावा…
तो घट्ट धरुन ठेवावा…
जीवाला निर्भय करणारी एकच विभूति…❗
ती म्हणजे सदगुरु